Origin of Babudom in India

 Till now I thought babu as a clerk with power of deliberation in day to day bureaucratic life. I was completely wrong. It realized me when I came across an enlightening passage from Young India written by Lala Lajpat Rai. Babu means a person in any sort of management who is a liaison between 'aam admi' and 'sarkar'.  The word actually originated from Bengalee Babu. After the Great Mutiny Britons in India sensed that they were rulers of India as India does not know how to rule. They were not Indian rulers but they were Britons. The new railways reserved first class compartments for whites only. Public restrooms were marked as "European" and "Native". In some churches Indian Christians were not allowed to sit in the cooler parts of the church or under fans. They seemed this policy as the best way to avoid social discord or another mutiny as well as it ensured that whites and only whites remained in charge. This exclusivity of theirs gave a chance to educated men from provinces like Bombay, Madras and Bengal. Many posts required knowledge on English. Bengal was one of the very first provinces ruled by British (British ruled Bengal from 1758) many Bengalees were readily available to fill these posts. Soon the English knowing Bengalees spread over the whole of North India. Here is excerpt from Young India to give native Indian's perception of these Bengalee Babus:
They were pioneers in every department of governmental activity and were looked to, both by the rulers and the people, for advice and guidance (Sounds familiar, right? Looks like we are reading about people from PMs office). His position under government filled him with pride and his gratitude and loyalty were overflowing.He relieved the British officer much from his intellectual work and left him ample time to play and rest. Many a departmental head ruled the country with with brain of the "Bengalee Babu". The Bengalee Babu worshipped the Firanghee as maay baap and began to imitate in his tastes. Gradually he became very fond of Enlish literature and began to think as an Englishman thought. The bengalees were first to send their sons to England for education and to compete for I.C.S (Indian Civil Services) and IMS (Indian Medical Services (Now if a word Babu is mentioned I know its not to refer to a clerk but it is a reference to IAS officers, the policymakers in India. Duh!). In England they lived in freedom but in India they were still considered as a 'nigger'. 
First generation of Bengalees was thus anglicised through and through. they looked down upon their own religion and glorified in being 'Sahibs'. Some of them became christians. Fair amount of bengalees though refused to be carried down stream, and inspite of their English education stuck to their own religion.  These veterans laid down the foundation of modern Bengalee literature. They wanted to pour their knowledge into their own mother tongue and in order to enlarge the vocabulary of Bengalee, they studied Sanskrit. Thus inspite of Anglicization of first Bengalee generation there grew up class of men imbued with nationalistic tendencies. Ram Mohan Roy, founder of the Brahmo Samaj, was the first builder of modern India.
The Bangalees were indispensable in every department. The heads of department always were English but the head of ministerial establish generally were Bengalees. The British laid down policies and gave order; the English knowing Indians saw that they were carried out. 
The British left after 15th Aug 1947 but left the Babus in India. The era of this babudom is yet to end. It will not end till the leaders of this country do not maintain the exclusivity maintained by the British. The more the leader has z-security the more he becomes important in Indian politics and the more he becomes detached from the aam admi. And the Babu-Raj thus continues.

अर्थशास्त्र आणि माया

मराठीत पैश्याला माया सुद्धा म्हटले जाते. एखाद्यानी जर भरपुर पैसा कमवला असेल तर 'त्याने भरपुर माया जमवली' असेही म्हटल्या जाते.आजवर मला या शब्दाची अचूकता लक्षात आली नाही पण Wall street वर चाललेल्या गोंधळामुळे माया हा शब्द किती 'अर्थ'पूर्ण आहे हे चांगलेच लक्षात आले. अर्थशास्त्राचा उगम बराच जुना आहे हे मी सांगणे न लगे. अगदी कापडाच्या बदल्यात धान्य किंवा अवजारांच्या बदल्यात गाय (याला bartering असा शब्द आहे.) ईथ पासुन तर Credit, derivatives, equities वगैरे (मला त्यातील फारस कळत अश्यातला भाग अजिबात नाही) पर्यंतचा हा प्रवास अतिशय विलक्षण आणि रसाळ (अथवा रटाळ वाचणार्यावर अवलंबुन आहे)असावा. Bartering च्या काळात धन्याच्या बदल्यात किती कापड द्यावे याचे परिमाण कुणीतरी विश्वासु आणि जाण्कार ठरवत असावे. काळानुरुपाने आता ते काम Foreign Exchange market (Forex) कडे आलेले आहे. दुसर्या महायुद्धा पासुन जगा मधे US चा पगडा वाढत गेला. झालेल्या नुकसानातुन पुन्हा उभे राहण्या करता मित्र राष्ट्रांनी US कडुन कर्ज काढले आणि पुढे जगातील उलाढालीचे Dollar हे चलन बनले. Soviet Union च्य अस्ता नंतर Capitalism चा बोलबला झाला.नवे पर्व उदयाला आले. Internet चा शोध लागल्या नंतर १९९० च्या दशकात समुद्राखालुन Optical fibers चे जाळे देशोदेशी पसरवण्यात आले. अमेरिकन economy ची भरारी internet द्वारा देशोदेशी पोहोचली. Outsourcing चे प्रमाण वाढु लागले. बेकारी कमी होउन तरुण वर्गाकडे पैसा (माया) खेळु लागला. Consumer based society (कर्ज काढुन सण करणारी व्रुत्ती) ची महती पटु लागली आणि एकंदरच कर्जाची भिती वाटेनाशी झाली. कर्ज घेणारे लोक जसजसे वाढु लागले तसतशी चांगला देणेकरी कोण हे ठरवणार्या परिमाणाची गरज वाढु लागली. त्यातुन पुढे Credit score, credit ratings चा concept निघाला. २००१ साली dot com चा bubble फुटला. पण Consumer based society ला उत्तेजन देण्यासाठी कर्जावरचा interest rate कमी करण्याचा निर्णय Federal Reserve Bank कडुन घेण्यात आला. कर्जाचे हे package इतके आकर्षक बनले की recession ला कंटाळलेली जनता कर्जावर तुटुन पडली व तो पैसा real estate मधे गुंतवु लागली. कमी का होइना पण जवळ असलेल्या पैशावर interest कमवण्याच्या कल्पनेने परदेशातील banks आणि companies सुद्धा US मधील लोकांना कर्ज पुरवु लागल्या. Companies मधे अधिकाधिक पैसा कमवण्याची चढाओढ सुरु झाली. त्यात Credit score व credit ratings ठरवणार्या companies कश्या सुटतील. दर चार महिन्यात company चा profit वाढवताना अनेक नियम धाब्यावर बसवल्या गेले. बाजारात कर्ज देण्यास कोण लायक हे ठरवण्याची जबाबदारी मूठभर private companies होती. Moody's व Standard & Poor's ही त्यातील आघाडीची नावे). वाहत्या पाण्यात हात धुण्यासाठी दोन वेळचे कसे बसे कमावणार्या लोकांनी सुद्धा कर्जाचे अर्ज दिले. interest च्या हव्यासापायी देशी/ परदेशी investment banks, hedge funds, private companies पैसा पुरवायला आतुर होत्या. अश्यावेळी कर्जदारांना चांगले rating देउन कर्जदारांना "qualified" बनवणे व त्यावर पैसा कमवणे या हेतुने Moody's व Standard & Poor's सारख्या companies कडुन बरेच नियम डावलल्या गेले. शिवाय investment banks, hedge funds, private companies यांनी किती पैसा बजारात खेळवावा व किती शिल्लकीत ठेवावा या वरचेही निर्बंध सैल करण्यात आले. कर्जदारांनी पैसा परत केला नाही तर त्याची भरपायी करता यावी या साठी वाट्टेल तश्या गुंतवलेल्या पैश्यावर insurance काढण्यात आले. हजारो-लाखो लोकांकडुन insurance काढण्यात आल्याने insurance companies नी पैसा कमवला.हा सगळा भ्रमाचा भोपळा supply demand पेक्षा जास्ती झाल्य झाल्याच फुटला. तो फुटणे तर अटळ होतेच पण त्यात अनेक लोकांनी अनेक तर्हेनी हवा भरल्याने त्यांच्या तोंडा इतकी इजा झाली की त्यात काहींचे बळी पडले. जसा जसा supply वाढत गेला demand तशी कमी होउ लागली. पैसा कमावण्याच्या नादात लोकांनी न झेपणारे कर्ज न झेपणार्या व्याजावर घेतले. शेवटी वेळ ही आली की घराची किंमत एवढी घसरली की असणारे कर्ज त्यापेक्षा जास्ती होउन बसले. ते फेडताना लोकांच्या नाकी नऊ आले. शेवटी त्यांनी हात वर करायला सुरवात केली. याचा सुगावा लागताच गुंतवणुकदार गुंतवलेला पैसा banks ला परत मागू लागले. बाजारात banks किती पैसा खेळतो आहे याची कल्पना अनेक परदेशी गुंतवणुकींमुळे वेळेवर येउ शकली नाही. कर्ज बुडवणार्या लोकांची संख्या लक्षात घेता Moody's व Standard & Poor's सारख्या companies ने काही investment banks चे बरेच पैसे बुडण्याचे भाकित केले. ते ऐकताच एकच गदारोळ माजला आणि त्या एकाच वेळेस सगळ्या गुंतवणुकदारांनी banks कडे पैसे परत मागितले. या सगळ्याला तोंड द्यायची क्षमता नसलेल्या banks (Bear Sterns, आणि Lehman, Meryll Lynch)बुडीत खात्यात गेल्या. परिस्तिथी अधिक चिघळू नये म्हणुन बुडणार्या पहिल्या bank (Bear sterns)ला Federal Bank ने हस्तक्षेप करुन JP Morgan Bank ला घेण्यास भाग पाडले. पण बदल्यात सामन्य लोकांचा पैसा guarentee म्हणुन वेठीस लावला. सामान्य लोकांना या मुळे फसवल्यासारखे वाटले. त्यामुळे दुसरी Bank (Lehman Bros.)लयाला जाताना कुठलाही हस्तक्षेप केला नाही. Meryll Lynch ने स्वतः चा मार्ग काढला आणि तिला Bank of America नी विकत घेतले. अश्या प्रकारे Banking giants समजल्या जाणार्या या ३ महाकाय investment banks महिनाभराच्या आत लयाला गेल्या. शिवाय कर्जा बुडण्याच्या परिस्तिथीत insurance देउ करणार्या companies कडे हजारो-लाखो लोक मोबदला मागण्याची शक्यता खरी ठरली. या कारणास्तव AIG सारखी महाकाय company लयाला जायच्या मार्गाला लागली. AIG जर रस्त्यावर आली तर फक्त US मधले नव्हे तर जगभरातले लाखो लोक रस्त्यवर येतील या भितीने Federal Bank ने पुन्हा हस्तक्षेप केला आणि AIG कडुन ही सारी कर्ज विकत घेतली. या सगळ्या गोंधळामुळे US ने गुंतवणुकदारांचा विश्वास गमावला. US stock market ला उतरती कळा लागली. एकंदर परिस्तिथी इतकी चिघळली आहे की congress नी pass केलेले 700bn चे bill ही फारशी करामत करणार नाही अशी भिती सगळी कडे पसरली आहे. या पुढे काय हे कुणालाच माहिती नाही पण गंमत ही की चलनाची किंमत ठरवण्या पासुन तर कर्जदारांचे चांगले/ वाईट ranking करण्यापर्यंत तर investment banks ची दररोज बदलणारी गुंतवणुकीचे आकडे सांगण्यापर्यंत तर किती लोक कर्ज न देता हात वर करणार याचा अंदाज लावण्या पर्यंत सगळे हवेतले मनोरे. सगळेच अजब. सगळीच माया!ही माया आणि अर्थशास्त्र यात आज न कळण्या इतकाच फरक रहिला आहे. मला यातले फारसे कळते अश्यातला भाग नाही पण काही प्रश्न पडले तर घरच्या माहितगाराची मदत मात्र होते ;)

माझी इंडिया डे परेड

न्यू जर्सीत रहुनही गेली चार वर्ष मी एकदाही इंडिया डे परेड ला गेले. मी नट नट्यांना पहाण्यात अजिबात उत्सुक नसल्याने तास-दोन तास ताटकळत उभ रहण आणि कुणाचे तरी ओझरते दर्शन घेउन गर्दीतुन वाट काढत ट्राफिक मधे अडकत कसबस घरी पोहचण माझ्या पचनी पडलं नव्हत. पण यावेळेस मात्र मी नुसतीच परेड पहाण्यासाठी गेले नाही तर परेड मधे भागही घेतला. झाले असे की, नोकरी व्यतिरीक्तही काही काम करावे असे मनात आले. मानवी ही संस्था अमेरीकेतील भारतीय उपखंडातील (मुख्यतः भारत,पकिस्तान व बांग्लादेश) पिडीत बायकांसाठी (Domestic Violence) काम करणारी संस्था आहे. चांगल्या कामाची सुरवात करण्यासाठी मी मानवीला निवडले. आणि एक दिवस मानवी कडुन इंडिया डे परेडचे invitation आले. मीही लगेच हो कळवुन टाकले. आजवर मी कुठल्याही परेडमधे भाग न घेतल्याने मला नक्की काय करायचे तेही माहिती नव्हते.इ-मेल ने कळवलेल्या पत्त्यावर मी बरोबर १:२५ ला पोहचले.पाच मिनिटांनी आणि चार जणी तिथे पोहोचल्या. परेड दीडलाच सुरु होणार होती पण ती भारतीय (भारतीयांनी भारतीयांना दिलेली) वेळ असल्याने अर्धा तास पुढे-मागे होणारच. दहा जणींसाठी तयार केलेले boards आम्ही पाच जणींनी धरले. मग मी शक्कल लढवुन एक board पुढुन आणि दुसरा मागुन दिसेल असे धरले. आमची उभी रहायची जागा दोन अवढव्य ट्र्क्स मधे ठरली. दोन्ही ट्र्क्सवरची पार्टी इतक्या उत्साहात होती की आम्ही चालण्यात दिरंगाई केली तर मागच्या ट्रकच्या लक्षात न येउन तो ट्रक आमच्या अंगावर आणायचा अशी भिती मला चाटुन गेली. दोन्ही ट्रक्स वर कानात दडे बसतील एवढ्या मोठयानी गाणी लागली होती.सोसट्याचा वारा असल्याने आणि अमच्या हातात दोन-दोन boards असल्याने आम्हाला boards घेउन चालणे अवघड झाले. आभाळ तर एवढे भरुन आले होते की कुठल्याही क्षणी आकाश फाटुन मुसळधार पाउस पडण्याची लक्षणं दिसत होती. माझ्या कापडी पर्सचा त्या पावसापुढे काहीही टिकाव लागणार नव्हता. माझ्या नवीन फोनचा मला लवकरच निरोप घ्यावा लागणार हेही उघड पणे दिसत होते. एवढ्यात माझ्या हातातील एका board नी board च्या दांडीशी न पटुन रस्त्यावर उडी मारली. सुरवात तर फारच चांगली झाली!तेवढ्यात दोन जणी आणि पोहोचल्या. त्यांनी बोर्ड कसाबसा पुन्हा चिपकवला आणि आमची दांडी यात्रा पुढे गेली. थोड्या थोड्या करता करता आम्ही आता १२ जणी जमलो. मागचा ट्रकवालाही (स्त्री शक्तीला घाबरुन की काय) बरेच अंतर ठेवुन चालवत होता. आता ट्रकवरची गाणी सुखावह वाटत होती, एक प्रकारचा जोश निर्माण करत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजुला तिरंगा घेतलेले लोक उभे होते. लहान-थोर गाण्यांवर ठेका घेत होते. आमच्यात एक साठीच्या आजीही होत्या.मागच्याच वर्षी भारतातुन आल्या होत्या. त्यांच उत्साह ओथंबुन वहात होता. संस्थेची pamphlets वाटण्याचे काम त्यांच्यावर सोपवले होते आणि त्याही अतिशय उत्साहानी पत्रक वाटत होत्या. त्यांची ना वार्याची तक्रार होती ना पावसाची. एव्हाना पावसाने आमची खैर केली होती पण तो आनंद फार वेळ टिकला नाही. पावसाची रिप रिप आता सुरु झाली होती. मी लगेच बरोबर घेतलेली छत्री उघडायचा प्रयत्न केला पण तिलाही तेव्हाच तुटायचे होते!बाहेर काढल्याने ती ओली झाली. म्हणजे तिला आता आत ठेवायची सोय नाही.अश्याप्रकारे आता वार्याचा मारा सहन करत मला बोर्ड आणि छत्री सांभाळणे आले शिवाय पावसात भिजणेही आलेच. पण एवढे होउनही आजींचा उत्साह मावळत नव्हता.थोडे पुढे गेल्यावर आम्हाला बरेच लोक दिसले. आता खरा 'देसी इलाका' सुरु झाला होता. लोक आम्हला पाण्याच्या आणि juice च्या बाटल्या देत होते (वास्तविक आम्ही तीन-चार कि.मी च चाललो असु). माझ्या एका हातात बोर्ड आणि दुसर्या हातात मोडकी छत्री असल्याने कितीही तहान लगली असली तरी पाण्याची बाटली घेणे शक्य नव्हते. काही लोक आम्हाला क़ेळी पण देत होते. ही सगळी तयारी रणरण उन्हात नक्की कामी आली असती. पण पाउस पडला म्हणुन त्याची किंमत कुठेही कमी होत नाही. लोकांचा आणि मुख्यतः आजींचा उत्साह पहुन मग मलाही जोश आला. मागच्या ट्रकवाल्यांसोबत मग मीही 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्' चे नारे द्यायला सुरवात केली. माझ पाहुन आजी ही नार्यांमधे सामील झाल्या आणि हळू हळू आमचा पूर्ण ग्रुप नारे द्यायला लागला. आमचे boards वाचुन आम्हाला समर्थन देण्या करता बरेच लोक टाळ्या वाजवु लागले. काही लोक संस्थेचे cards मागु लागले. आमच्यात इतका उत्साह संचारला की आकाश चांगलेच गळू लागले हे देखील आम्हला कळले नाही.अखेरीस परेड संपली.अचानक माझ्या फोनची मल अठवण झाली. फोनला काहीही झाले नव्हते. मधे फोनचा मला विसर पडला हे फारच बरे झाले. कितीतरी वर्षांनी मी पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला होता. परेड फक्त नट-नट्यांना पहाण्यासाठी नसते हेही लक्षात आले होते.शिवाय माझ्या आसपास लोक किती विविध प्रकारची काम करतात हेही लक्षात आले. तिथे निर्वासीत कश्मिरींचा ग्रुप आला होता, गुजरात आणि बंगलोर मधील स्फोटात मेलेल्या लोकांसाठी प्रार्थना करणारा ग्रुप आला होता, हिंदी भाषेचा प्रचार करणार ग्रुप आला होता. अश्या अनेक धार्मिक आणि सामजिक संस्थांचे प्रतिनिधी तिथे आले होते. या संस्थांना वहुन घेणारे लोक पहिल्यांदाच मला दिसत होते.

माझी पहिली-वहिली परेड अशी अविस्मर्णीय ठरली!

सिनेमा आणि माझे (गैर) समज

माझे सिनेमा संस्कार माझ्या ताईने माझ्यावर घडवले. तीला सिनेमाचे भलतेच वेड. तीचा अभ्यास रेडीयोच्या संगतीत चाले.आमच्या घरातील रेडीयोवर जाळी न चढु देण्याची जबाबदारीच जणु तीच्यावर होती. तसे माझे आई-वडीलही सिनेमा संगीत प्रेमी.रेडियोचा वापर ते फक्त कोणतं गाणं गावं हा clue घेण्यापुरता करत. अर्थात हे फक्त जुन्या गाण्या पर्यंतच मर्यादीत असे. पण त्यामुळे झाले काय की आमच्या ताईला जुने काय आणि नवे काय सगळे सिनीमे आणि सगळी गाणी पाठ. कुठले गाणे कुठल्या सिनेमातले किंवा कुठला नट-नटी कुठल्या सिनेमात अशी दोन गटांमधे पैज लागली की ताईचा गट हमखास जिंकत. त्यावेळेस google/internet available नसल्याने आमची ताई हिंदी सिनेमाच्या encyclopedia चे काम करी.तर ताई करते म्हणुन मी करणार असे माझे दिवस येताच माझी सिनेमा ओळख सुरु झाली. पण आजही मी ताई किंवा आई-बाबांच्या नखाचीही बरोबरी करु शकले नाही.पण या सगळया भानगडीत सिनेमामुळे माझे जे समज-गैरसमज निर्माण झाले ते आजही फारसे बदलले नहित.उदहरणार्थ, बरेली या गावाचा मुख्य धंदा चोरी असावा आणि संध्याकाळी थकुन-भागुन आलेले चोर बरेलीच्या बाजारात मन रमवत असावे असे माझे ठाम मत झाले.कोल्हापुरच्या मुली भलत्याच street smart असतात आणि भल्याभल्यांना पाणी पाजतात अशी एक image तयार झाली आहे.सातारा हे गाव मुली-बाळींसाठी अतिशय वाईट असल्याने एकट्य मुलीने (अपवाद कोल्हापुरच्या मुली)चुकुनही तिकडची वाट धरु नये असही बर्याच समजांपैकी एक समज.कही नावांभोवतीही चित्रपट स्रुष्टीने एक वलय निर्माण केले आहे. विजय हे नाव एक्दम दमदार वाटतं. लाईफबॉयची जहीरात करणारा किंवा वज्रदंती वापरुन अक्रोड फोडणार्याचे नाव विजय असावे. तर प्रेम किंव्वा राज हे नाव उच्चारताच एखादा पुचाट देवानंदच्या अंगयष्टीचा माणुस डोळ्यापुढे येतो.रामुकाका किंवा दिनुचाचा म्हणजे खांद्यावर पंचा घेतलेला A.K. हंगल सारखा माणुस डोळ्यापुढे येतो.रामुकाका किंवा दिनुचाचा हे पात्र प्रेम नावाच्या पात्रा भोवती किंव्वा एखाद्या भूत बंगल्यात कंदील घेवुन करकरता दरवाजा उघडतानाच शोभुन दिसत. अश्या प्रसंगी त्यन्चे कौतुकाचे भाव किंवा डोळ्यातील भकास भाव scene मधे भलतीच जान आणतात.Jimmy, Rocky, Anthony, सुर्या, देवा अशी पात्र पैदाईशी अनाथ आणि ज़ुल्मों के शिकार असतात.शिवाय गोगा, पाशा, ठकराल, शाकाल या नावांशिवाय तर सिनेमाच अधुरा.काही नावं अशी असतात की अशी नाव असलेल्या लोकांना काही अस्तिवच नसतं पण त्यांच्या मुली सिनेमाच्या heroin असल्याने त्याना सिनेस्रुष्टीत उदंड आयष्य आहे. जस की मुनिमजी, मुंशीजी, दिवाणजी, Mr.रस्तोगी,Mr.सक्सेना,Mr.देसाई इत्यादी.आता english किंवा hinglish सिनेमात थोड्याफार फरकानी ही नावं बदलतील पण categories मात्र अश्याच असतील.माझे हे समज ताईच्या समजांशी मिळते जुळते न्सतील पण एक मात्र नक्की की या सिनेमामुळे आम्ही दोघींनी गमती मात्र फार केल्या. ताईचे वाढते वेड पहुन आणि माझाही त्यातला सहभाग पाहुन बाबांनी आमच्यासाठी Philips चा double door stero आणला. झालं....आमच्या गाणी tape करण्याच्या सत्रांना सुमारच राहिला नाही.आमच्या कचाट्यातुन 'पु.ल पेटी' सुद्धा सुटली नाही. हळहळण्या व्यतिरीक्त बाबांपुढे कुठला ही उपाय रहिला नाही.त्यात भर म्हणुन माझी आत्ते बहीण अम्हाला सामिल झाली. आत्या कडच्या 'मुंगी उडाली आकाशी' वर आता धडकन ची गाणी वाजायला लागली.दोन्ही घरे बेजार झाली. ताईचे लग्न झाल्यावर सत्र थंडावले आणि लोकांच्या जीवात थोडा जीव आला!अजुनही CD वर गाणी burn करताना 'पु.ल पेटी'आणि 'मुंगी उडाली आकाशी'ची आठवण आल्याशिवाय रहात नाही आणि माझी हसुन पुरेवाट होते. आमच्या stero मुळे खुपच धमाल उडाली होती!

उन्हाळा

उन्हाळ्याच्या दिवसात न्हाणी आटोपली की आमची आजी गर्द पेरुच्या सावलीतुन पडणार्या कवडशात उन्हे खात बसे. आराम खुर्चीत एका हातात पुस्तक घेउन डुलक्या मारीत बसलेली आजी आणि तिच्या अवतीभोवती खेळत असलेली आम्ही नातवंड हे द्रुष्य सगळ्यांनाच परीचयाचे असे. कधी कुणी आजीला हलकेच उठवले की तिचे तोंडाला पदर लावुन हसणे ठरलेले असे. जेवणाची वेळ होताच डाळीच्या डब्यात पिकवण्यासाठी ठेवलेले आंबे बाहेर निघत. आम्हा कच्च्या बच्च्यां कडे ते माचवण्याचे काम येई तर कुणीतरी वडीलधारी रस काढण्याचे काम करी. उरलेल्या कोय आणि सालांचे वाटप आजी किंवा आजोबा करीत असे. कोय आणि सालांमधे कुठेही रस उरु नये याची काळजी आम्ही पुरेपुर घेत असु. तो सारा ढीग मग गायीपुढे टाकल्यात जात असे. पंगत सुरु होताच जेवण न करता खिदळत बसण्याचा आणि हात वाळवत बसण्याचा सार्या बच्चा कंपनीचा उद्योग चालत असे. त्यांना जेवायला लावण्याचे आजीला एक मोठेच काम होई. पण आजोबांची एकच हाक ऐकता वेड्यातले वेडे नातवंड मुकाट्याने जेवु लागत आणि पंगत अश्या तर्हेने वेळेवारी उठे. सगळ्यांची जेवणं आटोपताच बाहेर्च्या खोलीच्या साफसफाईचा आणि कुलरमधे पाणी भरण्याचा कार्यक्रम होत असे. कुलरचे पाते अश्या तर्हेनी फिरायचे की एका विशिष्ठ कोपर्यातच वारं लागत असे. त्या कोपर्यात झोपण्यासाठी एकच झुंबड उडत असे. मग रुसवे फुगवे होत दुपारची झोप आटोपायची. चार च्या सुमारास सातुचे पीठ खाण्याचा कार्यक्रम होई. उन्हे उतरताच पाळण्याभोवती मोठ्यांची सभा भरे. गप्पा, थट्टा - मस्करीला उत येत असे. आम्ही आजुबाजुला असल्यास बाबा आणि काका लोक आम्हाला त्यांच्या लहानपणीच्या गमती ऐकवत. आमच्या सुगीच्या दिवसांना तर सुमारच नसे. फिरायला गेलेले आजोबा chocolate च्या पुड्याशिवाय परतत नसत आणि आजी आम्हा नातवंडांना रसवंतीत घेउन जात असे. आमच्यातल्या मोठ्यांपैकी कुणाला तरी गच्चीत पाणी टाकावं लागत असे. रात्रीची जेवणं आटोपली की पत्त्यांचे २ जोड घेउन सत्ती लावणी चा डाव रंगे. ज्यांना खेळायचे नसेल त्यांच्यावर गच्चीत गाद्या घालण्याची जबाबदारी येई. सगळे झोपले की लगेच अंगावर पावसाचे दोन चार थेंब पडले पाहिजे असा जणु नियमच होता। आजोबा आणि बाबा लगेच गाद्या गुंडाळायची घाई करत। पण वाहुन गेलो तरी उठणार नाही अश्या निग्रहानी झोपलेल्या मंडळींची संख्या जास्ती असल्याने त्यांचा निरुपाय होत असे।
अश्या रीतीने उन्हाळ्याची सुट्टी कधी संपायची हे आम्हाला कळतही नसे। आता आजी-आजोबा नाहीत पण त्या आठवणी रसवंतीतील हातमशीनीला लागलेल्या घुंगरांचे आवाज जागे करतात. अजुनही गच्चीवर पाणी टाकतानाचा थंड-गरम अनुभव जसाच्यातसा आठवतो.

पलिकडचे जग


कुणीतरी खोलीत असावं अशी जाणीव मला सतत होत होती. अचानक डोक्यावरचा ट्युब लाईट अपशकुनी पापणी सारखा फडफडायला लागला. डॉक्टरांची विसीट आत्ताच होउन गेल्याने या अपरात्री bell वाजवुनही कुणी फिरकणार नव्हते. तरी मी हजार वेळेला सांगितले की रात्री दिवे बंदच ठेवा पण ऐकतय कोण! म्हणे hospital ची policy आहे.मरो मेली ती policy. आपल्याला तरी इथे रहायचय किती दिवस. कशाला कटकट करावी.आणि असो मेलं इथे कुणी खोलीत, माझ्याकडे कुथे आहे लुबाडायला खजिना!
पण आता मात्र या लुकलुकणार्या दिव्याचा त्रास होतो आहे. कधी मिट्ट काळोख कधी डोळे दिपवणारा उजेड. अरे का छळताय आजारयाला.बापरे! या लख्ख उजेडानी मी आंधळी झाले की काय? हे काय होतय? अरे कुणी आहे का? मी बोललेलं मलाच ऐकू येत नाहीया. हरे देवा!मी बहीरी झाले की मूकी?आत्ताच डॉक्टर सांगून गेले की आता बरीच सुधारणा आहे आणि आता हे भलतंच काय! माझ्या आयुष्याचा हा शेवट होणार? ते मघाशी जे मला खोलीत कुणीतरी असल्या सारख वाटत होतं तो माझा काळ माझं आयुष्य लुबाडायला आला आहे? आता मला हलकं हलकं वाटतय. कथा-कदंबर्यांमधे वाचलेल्या मरणार्या माणसोबत घडणार्या गोष्टी आता माझ्या सोबत घडताहेत. मी मरणार! संपलं सगळं! आता होइल पाप-पुण्याचा हिशोब त्या चित्रगुप्ता कडे. काय लिहीले आहे प्रारब्धात आता त्या सर्वशक्तिमानालाच ठाऊक.
अगदी कादंबरीत वर्णन केल्या प्रमाणे मला अनिर्बंध वाटतय.पण आजवर मेल्यानंतर पापात्मे अथवा पुण्यातमे दूरुन त्यांच्या आप्तेष्टांकडे पाहतात अश्या कथा माझ्या वाचण्यात आल्या होत्या. आंधळा, मूका आणि बहिरा अश्या दयनीय आत्म्याबद्दल वाचण्यात आले नव्हते. आत्म्यांच्या राज्यात मी नवा record बनवणार असं दिसतंय. चला जिवंतपणी नाही तर मेल्यावरच का होइना काहीतरी वेगळं केलं म्हणायचं! किंवा स्वर्ग/ नरकाकडे जाणारा गुप्त रस्ता कळु नये म्हणुन यमराजानी ही खबरदारी घेतली असावी. काय सांगता, जिथे प्रारब्ध लिहिले अहे तिथे पोहोचल्यावर सगळे इंद्रीय first class काम करायलाही लागतील. तसे झाले तर बरच होइल. Hospital मधे पलंगावर पडुन पडुन अंग दुखायला लगले होते.चला आता पाप पुण्याच्या हिशोबाला तयार होउया. आपलाही नंबर लवकरच लागेल.
अरे! माझा आकार वाढतो आहे की मी अतिसूक्षम झालेय? काळाचे, आकाराचे काही भानच उरले नाही.किती वेळ झाला मला इथे येउन? कोण घेउन आलंय मला? इथली system काय आहे तेच कळत नाही. हे असच चालू राहिलं ना तर मला काही वेळानी मी कोण हेही आठवणार नाही. कोण बरे मी? कुठुन आले? कोण आहे माझ्या मागे रडणारं? काय आहे माझ्यावाचु नडणारं? मला खरंच कही अठवत नाही.सध्या माझ्याजवळ आहे एक विशालतेचा आभास.अनंतातील शाश्वतीची सोबत. मी त्याचा एक भाग आहे. अगदी निर्गुण निराकार. कुणाचेही हाल बघायला मला डोळे नाहीत, कुणाचीही आर्त हाक माझ्या कानावर पडत नाही, कुठेही मी माझा निर्णय बोलत नाही. मला खेचुन आणणारी, मला दिशा देणारी एकच शक्ति आहे. कर्मं!कर्मातच ती ताकद आहे जी मला चांगले-वाईट दोष जोडेल. मला ब्रह्म ठरविण्याची अथवा शिव ठरविण्याची कुवत फक्त कर्मातच आहे. मुळात मी निर्गुण. मी ब्रह्मही, मीच संहारक शिवही आणि मी दोन्ही नाही. मीच रणरणतं वैराण वाळवंट आणि मीच गंगेचं पात्र, मीच एखाद्याचे नशीब आणि मीच एखाद्याचे दुर्भाग्य. अहो वळवाल तशी वळिन मी. पण वाहिन मात्र माझ्या गतीने. समय से पहिले कुछ नही मिलता. पण तुमचे नशीब तुमचे कर्म आहे.
माझ्या कर्माची फळं तर मी कधीच भोगलीत. स्वर्ग - नरक सबकुछ झुठ! तो जो तुमचा आकारा-विकारांचा देश आहे ना, अहो, तेच तर आहे स्वर्ग आणि नरक! हे इंद्रीयांचे चोचले इथे नाही. इथे आहे फक्त माझ्या वाहण्याचा आवाज.माझं वाहणं हेच तेवढं शाश्वत.
काय म्हणता, पुनर्जन्म आहे का? या आंधळेपणाला, मूकपणाला आणि शांततेला घाबरला नाहीत, या सततच्या वाहण्याला कंटाळला नाहीत तर पुनर्जन्म नाही. अन्यथा हे बळ येईतो आहेच पुन्हा तो जन्म.
मी मात्र रमलेय ईथेच. ईथे माझ्याशिवाय कुणीही नाही!

आवडत्या कवितांचा संग्रह

आश्चर्यठाऊक असणं आणि ठाऊक नसणं यांच्याखेरीज आणखी एक असतं ठाऊक असूनही ठाऊक नसणं
फांदीवर कुठे आहे लपलेला गाणं गाणारा पक्षी, वाट पाहणा-या डोळ्यांसारखं वेलीवरचं फूल नेमकं जरी तुम्हाला ठाऊक असलं तरीही ते ठाऊक नाही मुळीच असं समजून शोधायचं असतं : फूलाला आणि पक्ष्याला हवा असतो तुम्ही शोध घेतलेला !
आणि जेव्हा शोध लागल्याचं आश्चर्य व्यक्त करता तुम्ही अचानक कवितेची नवी ओळ सुचल्यागत तेव्हा हे प्रथमच नव्याने अनुभवल्याचा साक्षात्कार तुम्हाला कसा होतो हे मात्र तुम्हाला कळूनही कळत नाही...
मंगेश पाडगावकर


सब घोडे बारा टक्के

जितकी डोकी तितकी मते;
जितकी शिते तितकी भूते;
कोणी मवाळ कोणी जहाल;
कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ;
कोणी ढीले कोणी घट्ट;
कोणी कच्चे कोणी पक्के;
सब घोडे बारा टक्के!

गोड गोड जुन्या थापा;
(तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग;
जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार?
आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्या मधे
पुन्हा पुन्हा तोच पाय.
जुना माल नवे शिक्के
सब घोडे बारा टक्के!

जिकडे सत्ता तिकडे पोळी;
जिकदे सत्य तिकडे गोळी;
(जिकडे टक्के तिकडे टोळी)
ज्याचा पैसा त्यची सत्ता;
पुन्हा पुन्हा हाच कित्ता;
पुन्हा पुन्हा जुनाच स्वार;
मंद घोडा जुना स्वार;
याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!

सब घोडे! चंदी कमी;
कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी
कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा;
मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा;
कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्र्या कोणी छक्के.
सब घोडे बारा टक्के!

-विं.दा

तहानलेल्या क्षितिजानं ओंजळभर
पाणी मागितले तेव्हा
समुद्र ओशाळला
आजवर त्याला फक्त
समर्पण स्वीकारण्याचीच
सवय होती

- संजीवनी बोकिल

सगळंच काही लिहिता येत नही कगदावर;
पण न लिहिलेलंही वाचता येतं तुलाच!
सगळंच काही बोलता येत नाही शब्दांत;
पण अशब्दातलं सगळं समजतं तुलाच!
सगळेच अश्रु काही डोळ्यातुन ओघळत नाही;
पण न ओघळणारे दिसतात तुलाच!
असाच विश्वास ठेवते, वेळी अवेळी हाक मारते,
तुझ्या कानी ती जाणार नाही ही काळजी घेते,
अन ओ दिली नाहीस म्हणुन दोषी ठरवते
तेही तुलाच!

-पद्मा गोळे

माझ्या बेसावध खिडकीतून
येते उतरून
हळुच उन्हाचे भित्रे मांजर....


काचेच्या गालांना करुनी
शेपटीच्या मिस्किल टोकाने
हळुच गुदगुल्या....
गुबगुबीत पंजात आपुल्या
नखे लपवूनी
पडून राहते
सुस्तपणाने मिटून डोळे....

.... अन दाराच्या
झुलणार्‍या पडद्याची छाया
विणू लागते त्याच्यावरती
झिरझिरीत जाळीचे चेटूक....

-मंगेश पाडगांवकर



मैत्रीचे मी कोनेकोपरे धुंडाळून पाहिलेघट्ट नाती पुन्हा पुन्हा चाचपतच राहिले
मनात मने गुंफताना भरून आला जीववाटले आता दुराव्याची ओलांडली मी शीव
प्रत्येक भेटीत पण पुन्हा नवा परिचयपुन्हा पुन्हा संदिग्धता आणि नवे भय
गहनगूढ अंधारवाटा पाताळविहिरी खोलक्वचित कुठे तळाशी चुळकाभर ओल
स्पर्शातून जाणवणारे काही स्पर्शातीतसूर तेच तरी सुद्धा उमगत नाही गीत
रेशीमगाठी काचणा-या, चरत जाणारे व्रणनिकराच्या अंतीम क्षणी निमूट होणारे मन
-Shanta शेलके

खुणा
किती अलगद पाऊल टाकत आलेतरीही उठल्या खुणापाहिन पुसाया, होतील ठळकचआणि बोलक्या पुन्हा!

-पद्मा गोळे


मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा

स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा

मन थेंबांचे आकाश लाटांनी सावरलेले मन ऩक्षत्रांचे रान अवकाशी अवतरलेले

मन रानभूल मन चकवा मन काळोखाची गुंफ़ा

मन तेजाचे राऊळ मन सॆतानाचा हात मन देवाचे पाऊल

दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा

चेहरा मोहरा याचा कधी कुणी पाहिला नाही धनी अस्तित्वाचा तरीही याच्याविण दुसरा नाही

या अनोळ्खी नात्याचा कुणी कसा भरवसा द्यावा

सुधीर मोघे



Rollercoaster...!


वर खाली उलट पालट करत शेवटी पहिल्या rollercoster ची सवारी संपली. डोक नुसत भणभणत होत.नको अस्तनाही पुढच्या सवारीसाठी स्वतः ला तयार करणे भाग होते :( कुणीही चिथावले की तबडतोब त्याला उत्तर देण्यासाठी धावुन जायच्या स्वभावा मुळे पटवर्धन ground मधे लागणार्या प्रदर्शनातील आकाश पाळण््यालाही घाबरणार्या माझ्यावर rollercoaster's' वर बसायची वेळ आली. खाली डोके आणि खालीच पाय अश्या परीस्थितीत, कधी धरणी कधी आकाशाचे दर्शन घडवत पहिली फेरी पुर्ण झाली. 'ये अपने बस की बात नही' हे लक्शात येउनही 'जो वादा कीया वो निभाना पडेगा' या नियमानुसार मला उरलेल्या rollercoaster वर बसणे भाग पडले.शेवटी डोक कुठे आणि पाय कुठे हे ओळखण्यच्याही परीस्थितित मी नव्हते.
आज त्या गोष्टी चा विचार केला की हसायला येत.गम्मत म्हणुन Ride वर suprise cameras लपवले होते. ते photos आजही अठवले की हसुन पुरेवाट होते. सार्यान्च्या हसर्या चेहर्यान्मधे माझाच चेहरा तेवढा पोटात कळ आल्या सारखा दिसत होता. तेव्हा त्या photo ची लाज वाटली म्हणुन photo घ्यायचा टाळला. आज वाटत घेतला असता तर बर झाल असत.गम्मत या गोष्टीची वाटते की बरेचदा मला पुढचे दिसायचे. आता मी खाली जाणार, आता sharp turn येणार. पण सगळे माहिती असुनही पोटात खड्डा पडायचे चुकायचे नाही! आयुष्याचीही अशीच गम्मत असते नाही? बर्याच सुख-दुःखान्चा परिचय आपल्यला अधीच झालेला असतो बर्याचश्या क्श्णान्चे आपलया आयुष्यात येणे अपेक्शित असते। तरीही त्या क्शणाच्या अनुभवातील रोमान्च किव्वा पीडा कमी होत नाही.आयुष्याचा हा प्रवास बराचसा परीचित बराचसा अपरीचित; डोक भणभणवणारा; दररोज नव्या rollercoaster ची सवारी घडवणारा। सरतेशेवटी या प्रवासाकडे वळुन बघत हसणे महत्वाचे.