Friday, November 06, 2009

पावसाळ्यातली शाळा

परवा लायब्ररी मधे जाताना आभाळ भरून आल होत। वाटेत JPStevens highschool लागली। रोज पेक्षा शाळेत कमी गाड्या उभ्या होत्या मला अचानक माझ्या शाळेतल्या दिवसांची आठवण आली अश्या वातावरणात आई किती प्रकारे नको जाऊ हे सांगुन पहायची 'आज शाळेत कुणीही येणार नाही तुमची teacher सुद्धा येणार नाही कशाला जाते शाळेत ?' असे प्रश्न विचारले जायचे पण आईलाही माहिती होते की निव्वळ त्याच कारणासाठी मला शाळेत जायचे असायचे Raincoat घालून आणि दप्तारावर plastic टाकुन मी घरून निघायचे आणि अगदी वेळेवर पोहोचायचे अपेक्षे प्रमाणे शाळेत मी आणि माझ्यासारखे टारगट एक दोघे वर्गात असायचे आम्हाला पाहून 'मेल्यान्नो, कशाला आले तड्फ़डत?' असे वाचण्याजोगे भाव शिक्षकांच्या चेहर्यावर असायचे मग कधी नुसत्याच गप्पा व्हायच्या तर कधी period off मिळायचे। मग नुसतीच मस्ती अश्याच एका दिवशी off period मधे मी desk वर तबला बडवायला सुरुवात केली माझ्या desk वरुन दारातून येणारा-जाणारा दिसायचा दुरूनच K.B जोशी नावाचे खडूस मास्तर रागारागात येताना दिसताच मी desk बडवणे थम्बवले मी थांबत नाही तोच दुसर्या एका मुलाने desk बडवणे सुरु केले। त्याच वेळेस वर्गात सरांची entry झाली मघासपासून तबला बडवुन डोक उठावल म्हणुन सरांनी त्याला बडवल। माझ्या  नशीबानी माझ्या बाजूला बसलेल्या मुलीनी तोंड उघडले नाही नाहीतर desk बडवणे जन्मभरसाठीच cancel करावे लागले असते
शाळेतुन घरी येतानासुद्धा मजा यायची cycle मुद्दाम साचलेल्या पाण्यातून घेउन जायचे पाय भिजू ये म्हणुन ते पायडालवर घ्यायचे. घरी आल्यावर आईने विचारायचे 'किती मूल आली होती? आमकी अली होती का, तमकी आली होती का?' तिला हसत 'नाही' हे उत्तर देणे ठरलेले असायचे. कितीही waterproof दप्तर घेतल आणि कितीही plastic coated covers लावले तरीही भिजलेली पुस्तक fan खाली ठेवण्याचा एक उद्योग व्हायचा. आईनी हातात दिलेल्या towel नी खसखसुन डोके पुसले जायचे. आणि गरम गरम दूध आनंदानी मिटकवले जायचे.
दुसर्या दिवशी शाळेत पावसामुळे न आलेल्या मैत्रिणिन्ना आदल्या दिवशी झालेल्या गोष्टी तिखट मीठ लावून सान्गण्यातली मजाच काही और होती. आम्ही काही तरी dashing केले असा तोरा त्यात असायचा.
या आठवणिन्नी पावसात लायब्ररी मधे जाणे सार्थकी लागले म्हणायचे !

Sunday, November 01, 2009

माझे 'गेलेले' दिवस

गोखले बाईंच्या नादात मी एक लाख्शात घेतले पाहिजे की माझे सगलेच दिवस वाईट नव्हते। बाईनी जरी मला६ व्या आठवड्यात घाबरवले तरी माझ्या बाळाला पहिल्यांदा पहाण्याचे सुख अवर्णनीय होते। फारसे काही कळले नाही पण त्याच्या heart beats ऐकून मी खूपच excite झाले होते। शिवाय मला जो काहीएक महिना उलट्यांचा त्रास झाल त्यात माझ्या नवार्यानी केलेली मदत ही आयुष्यभर लक्षात ठेवण्याजोगी आहे। त्या काळात मला उलट्यान्मुले सारखेच बरे नाही असे वाटायचे। एक दिवस सगाल्याचा वीट येउन सकाळपसुनच मी रडायला सुरवात केली। तेव्हा त्यानी मला जे सांगितले त्या नंतर मी कधीही बरे वाटत नाही म्हणुन रडत बसले नाही। तो मला म्हणाला 'अग तू अशी रडलीस तर रडक्या जीवाला आकर्षीत करशील आणि दुखी जीव जन्माला येइल। हे दिवस थोडेच दिवस राहतील तेव्हा धीर धर।' आणि झालही तसाच। १५ दिवसांनी उलट्या थाम्ब्ल्या सुद्धा!
मधल्या काळात गोखले बाईंनी सुखानी बासु दिले अश्यातला भाग मुळीच नाही। मधेच त्यांना काय शंका आली तर त्यांनी मला oncologist कडे पाठवले! मीही जास्ती tension न घेण्याचे ठरवले। Tension घेउनही उपयोग काय होणार होता :)
January नंतर माझी तब्बेत एकदम झकासच झाली होती। माझ्या नवर्याचे भरपूर काम चालले होते आणि मीही झाल्या प्रकाराने दामले होते। तेव्हा आम्ही मस्त break घ्यायचे ठरवले।

क्रमश:

Wednesday, October 28, 2009

माझे 'गेलेले' दिवस

आमच्या कंप्यूटरनी मान टाकल्याने आजकाल माझे वेब वर येणे orkut, gmail, yahoo पुरातेच सीमित असते। त्यामुळे 'गोखले बाईंच्या सुरस कथा' राहुनच गेल्या :D ६व्या आठवड्यातच गोखले बाईंनी आमच्या हृदयाचा ठोका चुकवला। पहिलाच अनुभव असल्याने प्रत्येक छोट्या गोष्टी आम्ही डॉक्टर ला सांगायच्या ठरवल्या। माझा blood group -ve असल्याने त्यांनी आम्हाला काळजी घ्यायला सांगितली। ६व्या आठवड्यात आम्हाला काळजी वाटताच आम्ही त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी आम्हाला सगळ्या आशा मावळल्या असण्याची शक्यता सांगितली। खर तर तशी शक्यता १०% आणि तसे नसण्याची शक्यता ९०% होती! हां आम्हाला बसलेला पहिला झटका! Ultrasound मधे सगळे ठीक असल्याचे कळले। त्या नंतरच्या tests मधे मला iron defeciency आहे हे लक्षात आले तर तिनी मला Alpha thalassemia असण्याची शक्यता सांगितली। त्यानंतर आम्हाला घबरावण्याचा तिनी चंगच बांधला। माझ्या नवर्याला जर Alpha थालास्सेमिया असेल तर पुढच्या आमच्या सगळ्या आकांक्षा धुळीस मिळतील असेही बी बोलल्या। Fortunately माझ्याकडे आधीच्या test चे result असल्याने टी शक्यता मीच खोडून लावली। पण मला iron च्या गोळ्या सुरु झाल्या आणि माझा सुखाचा जीव दुःखात पडला। गोळ्या suit न झाल्याने मला नसलेला उलट्यांचा त्रास सुरु झाला! ऑफिस मधे डोंगरा एवढे काम आणि अतिशय hostile टीम यामुळे माझा धीर सुटला। या परिस्थित माझा नवर्याचा मला खुप आधार मिळाला!

-क्रमश:

Tuesday, September 08, 2009

माझे गेलेले 'दिवस'

नव्हेम्बर महिन्यात आमच्या घरी गोड बातमी आली आणि माला दिवस गेल्याचे कळले। तेव्हा पसुनाचा प्रवास माझ्यासाठी अविस्मरणिय होता। खरतर तो प्रत्येकच स्त्रीसाठी अविस्मरणिय असतो। पण माझा प्रवास अजुन एक कारणा साठी अविस्मरणिय होता। ते कारण म्हणजे माझी डॉक्टर ! Preliminary test मधे 'Good news' कळल्यनन्तर कुठलाही विचार न करता आम्ही या डॉक्टरकड़े गेलो। त्यांचा नाव आपण या गोश्टीपुरत 'गोखले' ठेऊ। तर मराठी डॉक्टर आणि ३० वर्षांची practice असल्याने आणि काय विचार करायचा होता। तसे त्यांच्या तर्हेवाइकपणाचे किस्से माहिती असुनही आम्ही त्यांना निवडले। Preliminary टेस्ट चे reports घेउन गेल्यावर पहिल वाक्य बाईंच्या तोंडून निघाल ते अस 'रिपोर्ट्स वरुन तुम्हाला कळलच आहे की ही pregnant आहे, तेव्हा मी congratulations वगैरे काही म्हणणार नाही।' त्यांच्या या बोलण्यानी आम्ही चाटच पडलो। खरतर तेव्हाच आम्ही तिथून उठून जायला हवे होते पण दुर्दैवाने आम्ही तसे केले नाही।
क्रमशः

Tuesday, April 07, 2009

चीमा काय कामाची?

लहानपणी या वाक्याची आम्हाला फारच गंमत वाटायची. या वाक्याला उलटे वाचले तरी तेच वाक्य बनते. शिवाय कॉलनी मधे चीमा बोरगावकरला चिडवायलाही हे वाक्य वापरले जायचे. चीमाचे खरे नाव मला आजही माहिती नाही.बिचारी चीमा!पण हल्ली मला चीमा असल्या सारखे वाटायला लागले आहे।
मागच्या वर्षी मी जेव्हा भारतात गेले तेव्हा मला अमुलाग्र बदल दिसला. माझे जे तिथले अनुभव आहेत ते इथल्या ओळखीतल्या जवळ-जवळ सगळ्यांनीच अनुभवले. पण बर्याच जणांना या बदलाची जी खंत वाटली ती मला वाटली नाही. बदल हे प्रगती चे लक्शण आहे आणि तुम्हला आम्हाला गोष्टी कितीही बदलू नये वाटलं तरी त्या बदलतीलच. मला आनंद आहे की हा बदल आपल्या देशाच्या बाब्तीत चांगल्या दिशेनी घडतो आहे. शिवाय जोवर आपलं घरटं जस उबदार होतं तसंच ते परतल्यावरही असलं तर जग बदलले तरी काय फरक पडतो !या झपाट्यानी बदलणार्या परिस्तिथीच आपण भाग नाही ही खंत कधी उरतच नाही. जर कधीही या घरट्याची आठवण येउन मन उदास होते तेव्हा विचार येतो की आपण आणि मुंबई/पुणे, बंगलोर, दिल्ली या सारख्या ठिकाणी काम करणार्या लोकांची परिस्थिती आपल्यापेक्शा काय वेगळी! ते तरी कुठे उठसुठ आपल्या गावी जाऊ शकतात? आणि माझ्या काही मैत्रिणी खरच वर्षा दीड वर्षांनी माहेरी जातात. मग त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक? पण फरक आहे!वेळ प्रसंगी त्या मदतीला जाऊ शकतात. दोन दिवस/ पंधरा दिवस राहू शकतात. मी नाही जाऊ शकत. मागच्या वर्षी चे उदाहरण मला चांगलेच आठवते. माझ्या नवर्याला त्याच्या मावशीची तब्बेत वाईट असल्या बद्दल कळले. त्यानी लगेच जायचा विचार केला. पण त्याला विसा renew केल्या शिवाय देश सोडता आला नाही. सुदैवानी मावशींची अजुनही भेट होते. पण अश्या वेळेस इथे असण्यातला आणि तिथे असण्यातला फरक कळतो आणि विचार येतो आपण काय कामाचे!घरच्यांना ही परिस्थिती आधीच माहिती असते. घरच्या चिंतापासुन ते आपल्याल दुर ठेवु लागतात. चिंता सांगुन उपयोग तरी काय? एवढ्या दुरुन करु तरी काय शकणार?लहानपणी घरी बरेच कठीण प्रसंग आले. कधी चिमुकल्या मनाला प्रसंगाचे गांभीर्य कळले कधी सगळ्यांचे चेहरे पाहुन वेडेवाकडे वागू नये एवढेच लक्शात आले. मोठे झाल्यावर कधी मदत करता आली तर कधी कधी घरच्यांची तकतक नुसतीच दुरुन पाहिली. जाणते अजाणतेपणे या प्रसंगांनी बरेच काही शिकवले. त्या क्शणांचा मी भाग होते हा विचार निराळे समाधान देऊन जातो. पण आज या हजारो मैलांच्या अंतरानी ते क्शण माझ्यापसुन साता समुद्रा पलिकडे नेले. मला कळेपर्यंत घरातील वादळ शमलेले असते. पण त्या वादळातुन माझे लोक कसे गेले असतील, त्यांना कोणी मदत केली असेल, त्यांच्यावर कसे प्रसंग आले असतील हे विचार आल्या शिवाय रहात नाही. आणि शेवटी विचार येतो घरची चीमा घरटे सोडुन दुर निघुन गेली.आता चीमा काय कामाची?

Friday, December 19, 2008

Origin of Babudom in India

 Till now I thought babu as a clerk with power of deliberation in day to day bureaucratic life. I was completely wrong. It realized me when I came across an enlightening passage from Young India written by Lala Lajpat Rai. Babu means a person in any sort of management who is a liaison between 'aam admi' and 'sarkar'.  The word actually originated from Bengalee Babu. After the Great Mutiny Britons in India sensed that they were rulers of India as India does not know how to rule. They were not Indian rulers but they were Britons. The new railways reserved first class compartments for whites only. Public restrooms were marked as "European" and "Native". In some churches Indian Christians were not allowed to sit in the cooler parts of the church or under fans. They seemed this policy as the best way to avoid social discord or another mutiny as well as it ensured that whites and only whites remained in charge. This exclusivity of theirs gave a chance to educated men from provinces like Bombay, Madras and Bengal. Many posts required knowledge on English. Bengal was one of the very first provinces ruled by British (British ruled Bengal from 1758) many Bengalees were readily available to fill these posts. Soon the English knowing Bengalees spread over the whole of North India. Here is excerpt from Young India to give native Indian's perception of these Bengalee Babus:
They were pioneers in every department of governmental activity and were looked to, both by the rulers and the people, for advice and guidance (Sounds familiar, right? Looks like we are reading about people from PMs office). His position under government filled him with pride and his gratitude and loyalty were overflowing.He relieved the British officer much from his intellectual work and left him ample time to play and rest. Many a departmental head ruled the country with with brain of the "Bengalee Babu". The Bengalee Babu worshipped the Firanghee as maay baap and began to imitate in his tastes. Gradually he became very fond of Enlish literature and began to think as an Englishman thought. The bengalees were first to send their sons to England for education and to compete for I.C.S (Indian Civil Services) and IMS (Indian Medical Services (Now if a word Babu is mentioned I know its not to refer to a clerk but it is a reference to IAS officers, the policymakers in India. Duh!). In England they lived in freedom but in India they were still considered as a 'nigger'. 
First generation of Bengalees was thus anglicised through and through. they looked down upon their own religion and glorified in being 'Sahibs'. Some of them became christians. Fair amount of bengalees though refused to be carried down stream, and inspite of their English education stuck to their own religion.  These veterans laid down the foundation of modern Bengalee literature. They wanted to pour their knowledge into their own mother tongue and in order to enlarge the vocabulary of Bengalee, they studied Sanskrit. Thus inspite of Anglicization of first Bengalee generation there grew up class of men imbued with nationalistic tendencies. Ram Mohan Roy, founder of the Brahmo Samaj, was the first builder of modern India.
The Bangalees were indispensable in every department. The heads of department always were English but the head of ministerial establish generally were Bengalees. The British laid down policies and gave order; the English knowing Indians saw that they were carried out. 
The British left after 15th Aug 1947 but left the Babus in India. The era of this babudom is yet to end. It will not end till the leaders of this country do not maintain the exclusivity maintained by the British. The more the leader has z-security the more he becomes important in Indian politics and the more he becomes detached from the aam admi. And the Babu-Raj thus continues.

Monday, October 06, 2008

अर्थशास्त्र आणि माया

मराठीत पैश्याला माया सुद्धा म्हटले जाते. एखाद्यानी जर भरपुर पैसा कमवला असेल तर 'त्याने भरपुर माया जमवली' असेही म्हटल्या जाते.आजवर मला या शब्दाची अचूकता लक्षात आली नाही पण Wall street वर चाललेल्या गोंधळामुळे माया हा शब्द किती 'अर्थ'पूर्ण आहे हे चांगलेच लक्षात आले. अर्थशास्त्राचा उगम बराच जुना आहे हे मी सांगणे न लगे. अगदी कापडाच्या बदल्यात धान्य किंवा अवजारांच्या बदल्यात गाय (याला bartering असा शब्द आहे.) ईथ पासुन तर Credit, derivatives, equities वगैरे (मला त्यातील फारस कळत अश्यातला भाग अजिबात नाही) पर्यंतचा हा प्रवास अतिशय विलक्षण आणि रसाळ (अथवा रटाळ वाचणार्यावर अवलंबुन आहे)असावा. Bartering च्या काळात धन्याच्या बदल्यात किती कापड द्यावे याचे परिमाण कुणीतरी विश्वासु आणि जाण्कार ठरवत असावे. काळानुरुपाने आता ते काम Foreign Exchange market (Forex) कडे आलेले आहे. दुसर्या महायुद्धा पासुन जगा मधे US चा पगडा वाढत गेला. झालेल्या नुकसानातुन पुन्हा उभे राहण्या करता मित्र राष्ट्रांनी US कडुन कर्ज काढले आणि पुढे जगातील उलाढालीचे Dollar हे चलन बनले. Soviet Union च्य अस्ता नंतर Capitalism चा बोलबला झाला.नवे पर्व उदयाला आले. Internet चा शोध लागल्या नंतर १९९० च्या दशकात समुद्राखालुन Optical fibers चे जाळे देशोदेशी पसरवण्यात आले. अमेरिकन economy ची भरारी internet द्वारा देशोदेशी पोहोचली. Outsourcing चे प्रमाण वाढु लागले. बेकारी कमी होउन तरुण वर्गाकडे पैसा (माया) खेळु लागला. Consumer based society (कर्ज काढुन सण करणारी व्रुत्ती) ची महती पटु लागली आणि एकंदरच कर्जाची भिती वाटेनाशी झाली. कर्ज घेणारे लोक जसजसे वाढु लागले तसतशी चांगला देणेकरी कोण हे ठरवणार्या परिमाणाची गरज वाढु लागली. त्यातुन पुढे Credit score, credit ratings चा concept निघाला. २००१ साली dot com चा bubble फुटला. पण Consumer based society ला उत्तेजन देण्यासाठी कर्जावरचा interest rate कमी करण्याचा निर्णय Federal Reserve Bank कडुन घेण्यात आला. कर्जाचे हे package इतके आकर्षक बनले की recession ला कंटाळलेली जनता कर्जावर तुटुन पडली व तो पैसा real estate मधे गुंतवु लागली. कमी का होइना पण जवळ असलेल्या पैशावर interest कमवण्याच्या कल्पनेने परदेशातील banks आणि companies सुद्धा US मधील लोकांना कर्ज पुरवु लागल्या. Companies मधे अधिकाधिक पैसा कमवण्याची चढाओढ सुरु झाली. त्यात Credit score व credit ratings ठरवणार्या companies कश्या सुटतील. दर चार महिन्यात company चा profit वाढवताना अनेक नियम धाब्यावर बसवल्या गेले. बाजारात कर्ज देण्यास कोण लायक हे ठरवण्याची जबाबदारी मूठभर private companies होती. Moody's व Standard & Poor's ही त्यातील आघाडीची नावे). वाहत्या पाण्यात हात धुण्यासाठी दोन वेळचे कसे बसे कमावणार्या लोकांनी सुद्धा कर्जाचे अर्ज दिले. interest च्या हव्यासापायी देशी/ परदेशी investment banks, hedge funds, private companies पैसा पुरवायला आतुर होत्या. अश्यावेळी कर्जदारांना चांगले rating देउन कर्जदारांना "qualified" बनवणे व त्यावर पैसा कमवणे या हेतुने Moody's व Standard & Poor's सारख्या companies कडुन बरेच नियम डावलल्या गेले. शिवाय investment banks, hedge funds, private companies यांनी किती पैसा बजारात खेळवावा व किती शिल्लकीत ठेवावा या वरचेही निर्बंध सैल करण्यात आले. कर्जदारांनी पैसा परत केला नाही तर त्याची भरपायी करता यावी या साठी वाट्टेल तश्या गुंतवलेल्या पैश्यावर insurance काढण्यात आले. हजारो-लाखो लोकांकडुन insurance काढण्यात आल्याने insurance companies नी पैसा कमवला.हा सगळा भ्रमाचा भोपळा supply demand पेक्षा जास्ती झाल्य झाल्याच फुटला. तो फुटणे तर अटळ होतेच पण त्यात अनेक लोकांनी अनेक तर्हेनी हवा भरल्याने त्यांच्या तोंडा इतकी इजा झाली की त्यात काहींचे बळी पडले. जसा जसा supply वाढत गेला demand तशी कमी होउ लागली. पैसा कमावण्याच्या नादात लोकांनी न झेपणारे कर्ज न झेपणार्या व्याजावर घेतले. शेवटी वेळ ही आली की घराची किंमत एवढी घसरली की असणारे कर्ज त्यापेक्षा जास्ती होउन बसले. ते फेडताना लोकांच्या नाकी नऊ आले. शेवटी त्यांनी हात वर करायला सुरवात केली. याचा सुगावा लागताच गुंतवणुकदार गुंतवलेला पैसा banks ला परत मागू लागले. बाजारात banks किती पैसा खेळतो आहे याची कल्पना अनेक परदेशी गुंतवणुकींमुळे वेळेवर येउ शकली नाही. कर्ज बुडवणार्या लोकांची संख्या लक्षात घेता Moody's व Standard & Poor's सारख्या companies ने काही investment banks चे बरेच पैसे बुडण्याचे भाकित केले. ते ऐकताच एकच गदारोळ माजला आणि त्या एकाच वेळेस सगळ्या गुंतवणुकदारांनी banks कडे पैसे परत मागितले. या सगळ्याला तोंड द्यायची क्षमता नसलेल्या banks (Bear Sterns, आणि Lehman, Meryll Lynch)बुडीत खात्यात गेल्या. परिस्तिथी अधिक चिघळू नये म्हणुन बुडणार्या पहिल्या bank (Bear sterns)ला Federal Bank ने हस्तक्षेप करुन JP Morgan Bank ला घेण्यास भाग पाडले. पण बदल्यात सामन्य लोकांचा पैसा guarentee म्हणुन वेठीस लावला. सामान्य लोकांना या मुळे फसवल्यासारखे वाटले. त्यामुळे दुसरी Bank (Lehman Bros.)लयाला जाताना कुठलाही हस्तक्षेप केला नाही. Meryll Lynch ने स्वतः चा मार्ग काढला आणि तिला Bank of America नी विकत घेतले. अश्या प्रकारे Banking giants समजल्या जाणार्या या ३ महाकाय investment banks महिनाभराच्या आत लयाला गेल्या. शिवाय कर्जा बुडण्याच्या परिस्तिथीत insurance देउ करणार्या companies कडे हजारो-लाखो लोक मोबदला मागण्याची शक्यता खरी ठरली. या कारणास्तव AIG सारखी महाकाय company लयाला जायच्या मार्गाला लागली. AIG जर रस्त्यावर आली तर फक्त US मधले नव्हे तर जगभरातले लाखो लोक रस्त्यवर येतील या भितीने Federal Bank ने पुन्हा हस्तक्षेप केला आणि AIG कडुन ही सारी कर्ज विकत घेतली. या सगळ्या गोंधळामुळे US ने गुंतवणुकदारांचा विश्वास गमावला. US stock market ला उतरती कळा लागली. एकंदर परिस्तिथी इतकी चिघळली आहे की congress नी pass केलेले 700bn चे bill ही फारशी करामत करणार नाही अशी भिती सगळी कडे पसरली आहे. या पुढे काय हे कुणालाच माहिती नाही पण गंमत ही की चलनाची किंमत ठरवण्या पासुन तर कर्जदारांचे चांगले/ वाईट ranking करण्यापर्यंत तर investment banks ची दररोज बदलणारी गुंतवणुकीचे आकडे सांगण्यापर्यंत तर किती लोक कर्ज न देता हात वर करणार याचा अंदाज लावण्या पर्यंत सगळे हवेतले मनोरे. सगळेच अजब. सगळीच माया!ही माया आणि अर्थशास्त्र यात आज न कळण्या इतकाच फरक रहिला आहे. मला यातले फारसे कळते अश्यातला भाग नाही पण काही प्रश्न पडले तर घरच्या माहितगाराची मदत मात्र होते ;)