Tuesday, April 07, 2009
चीमा काय कामाची?
मागच्या वर्षी मी जेव्हा भारतात गेले तेव्हा मला अमुलाग्र बदल दिसला. माझे जे तिथले अनुभव आहेत ते इथल्या ओळखीतल्या जवळ-जवळ सगळ्यांनीच अनुभवले. पण बर्याच जणांना या बदलाची जी खंत वाटली ती मला वाटली नाही. बदल हे प्रगती चे लक्शण आहे आणि तुम्हला आम्हाला गोष्टी कितीही बदलू नये वाटलं तरी त्या बदलतीलच. मला आनंद आहे की हा बदल आपल्या देशाच्या बाब्तीत चांगल्या दिशेनी घडतो आहे. शिवाय जोवर आपलं घरटं जस उबदार होतं तसंच ते परतल्यावरही असलं तर जग बदलले तरी काय फरक पडतो !या झपाट्यानी बदलणार्या परिस्तिथीच आपण भाग नाही ही खंत कधी उरतच नाही. जर कधीही या घरट्याची आठवण येउन मन उदास होते तेव्हा विचार येतो की आपण आणि मुंबई/पुणे, बंगलोर, दिल्ली या सारख्या ठिकाणी काम करणार्या लोकांची परिस्थिती आपल्यापेक्शा काय वेगळी! ते तरी कुठे उठसुठ आपल्या गावी जाऊ शकतात? आणि माझ्या काही मैत्रिणी खरच वर्षा दीड वर्षांनी माहेरी जातात. मग त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक? पण फरक आहे!वेळ प्रसंगी त्या मदतीला जाऊ शकतात. दोन दिवस/ पंधरा दिवस राहू शकतात. मी नाही जाऊ शकत. मागच्या वर्षी चे उदाहरण मला चांगलेच आठवते. माझ्या नवर्याला त्याच्या मावशीची तब्बेत वाईट असल्या बद्दल कळले. त्यानी लगेच जायचा विचार केला. पण त्याला विसा renew केल्या शिवाय देश सोडता आला नाही. सुदैवानी मावशींची अजुनही भेट होते. पण अश्या वेळेस इथे असण्यातला आणि तिथे असण्यातला फरक कळतो आणि विचार येतो आपण काय कामाचे!घरच्यांना ही परिस्थिती आधीच माहिती असते. घरच्या चिंतापासुन ते आपल्याल दुर ठेवु लागतात. चिंता सांगुन उपयोग तरी काय? एवढ्या दुरुन करु तरी काय शकणार?लहानपणी घरी बरेच कठीण प्रसंग आले. कधी चिमुकल्या मनाला प्रसंगाचे गांभीर्य कळले कधी सगळ्यांचे चेहरे पाहुन वेडेवाकडे वागू नये एवढेच लक्शात आले. मोठे झाल्यावर कधी मदत करता आली तर कधी कधी घरच्यांची तकतक नुसतीच दुरुन पाहिली. जाणते अजाणतेपणे या प्रसंगांनी बरेच काही शिकवले. त्या क्शणांचा मी भाग होते हा विचार निराळे समाधान देऊन जातो. पण आज या हजारो मैलांच्या अंतरानी ते क्शण माझ्यापसुन साता समुद्रा पलिकडे नेले. मला कळेपर्यंत घरातील वादळ शमलेले असते. पण त्या वादळातुन माझे लोक कसे गेले असतील, त्यांना कोणी मदत केली असेल, त्यांच्यावर कसे प्रसंग आले असतील हे विचार आल्या शिवाय रहात नाही. आणि शेवटी विचार येतो घरची चीमा घरटे सोडुन दुर निघुन गेली.आता चीमा काय कामाची?
Friday, December 19, 2008
Origin of Babudom in India
Monday, October 06, 2008
अर्थशास्त्र आणि माया
Sunday, August 10, 2008
माझी इंडिया डे परेड
न्यू जर्सीत रहुनही गेली चार वर्ष मी एकदाही इंडिया डे परेड ला गेले. मी नट नट्यांना पहाण्यात अजिबात उत्सुक नसल्याने तास-दोन तास ताटकळत उभ रहण आणि कुणाचे तरी ओझरते दर्शन घेउन गर्दीतुन वाट काढत ट्राफिक मधे अडकत कसबस घरी पोहचण माझ्या पचनी पडलं नव्हत. पण यावेळेस मात्र मी नुसतीच परेड पहाण्यासाठी गेले नाही तर परेड मधे भागही घेतला. झाले असे की, नोकरी व्यतिरीक्तही काही काम करावे असे मनात आले. मानवी ही संस्था अमेरीकेतील भारतीय उपखंडातील (मुख्यतः भारत,पकिस्तान व बांग्लादेश) पिडीत बायकांसाठी (Domestic Violence) काम करणारी संस्था आहे. चांगल्या कामाची सुरवात करण्यासाठी मी मानवीला निवडले. आणि एक दिवस मानवी कडुन इंडिया डे परेडचे invitation आले. मीही लगेच हो कळवुन टाकले. आजवर मी कुठल्याही परेडमधे भाग न घेतल्याने मला नक्की काय करायचे तेही माहिती नव्हते.इ-मेल ने कळवलेल्या पत्त्यावर मी बरोबर १:२५ ला पोहचले.पाच मिनिटांनी आणि चार जणी तिथे पोहोचल्या. परेड दीडलाच सुरु होणार होती पण ती भारतीय (भारतीयांनी भारतीयांना दिलेली) वेळ असल्याने अर्धा तास पुढे-मागे होणारच. दहा जणींसाठी तयार केलेले boards आम्ही पाच जणींनी धरले. मग मी शक्कल लढवुन एक board पुढुन आणि दुसरा मागुन दिसेल असे धरले. आमची उभी रहायची जागा दोन अवढव्य ट्र्क्स मधे ठरली. दोन्ही ट्र्क्सवरची पार्टी इतक्या उत्साहात होती की आम्ही चालण्यात दिरंगाई केली तर मागच्या ट्रकच्या लक्षात न येउन तो ट्रक आमच्या अंगावर आणायचा अशी भिती मला चाटुन गेली. दोन्ही ट्रक्स वर कानात दडे बसतील एवढ्या मोठयानी गाणी लागली होती.सोसट्याचा वारा असल्याने आणि अमच्या हातात दोन-दोन boards असल्याने आम्हाला boards घेउन चालणे अवघड झाले. आभाळ तर एवढे भरुन आले होते की कुठल्याही क्षणी आकाश फाटुन मुसळधार पाउस पडण्याची लक्षणं दिसत होती. माझ्या कापडी पर्सचा त्या पावसापुढे काहीही टिकाव लागणार नव्हता. माझ्या नवीन फोनचा मला लवकरच निरोप घ्यावा लागणार हेही उघड पणे दिसत होते. एवढ्यात माझ्या हातातील एका board नी board च्या दांडीशी न पटुन रस्त्यावर उडी मारली. सुरवात तर फारच चांगली झाली!तेवढ्यात दोन जणी आणि पोहोचल्या. त्यांनी बोर्ड कसाबसा पुन्हा चिपकवला आणि आमची दांडी यात्रा पुढे गेली. थोड्या थोड्या करता करता आम्ही आता १२ जणी जमलो. मागचा ट्रकवालाही (स्त्री शक्तीला घाबरुन की काय) बरेच अंतर ठेवुन चालवत होता. आता ट्रकवरची गाणी सुखावह वाटत होती, एक प्रकारचा जोश निर्माण करत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजुला तिरंगा घेतलेले लोक उभे होते. लहान-थोर गाण्यांवर ठेका घेत होते. आमच्यात एक साठीच्या आजीही होत्या.मागच्याच वर्षी भारतातुन आल्या होत्या. त्यांच उत्साह ओथंबुन वहात होता. संस्थेची pamphlets वाटण्याचे काम त्यांच्यावर सोपवले होते आणि त्याही अतिशय उत्साहानी पत्रक वाटत होत्या. त्यांची ना वार्याची तक्रार होती ना पावसाची. एव्हाना पावसाने आमची खैर केली होती पण तो आनंद फार वेळ टिकला नाही. पावसाची रिप रिप आता सुरु झाली होती. मी लगेच बरोबर घेतलेली छत्री उघडायचा प्रयत्न केला पण तिलाही तेव्हाच तुटायचे होते!बाहेर काढल्याने ती ओली झाली. म्हणजे तिला आता आत ठेवायची सोय नाही.अश्याप्रकारे आता वार्याचा मारा सहन करत मला बोर्ड आणि छत्री सांभाळणे आले शिवाय पावसात भिजणेही आलेच. पण एवढे होउनही आजींचा उत्साह मावळत नव्हता.थोडे पुढे गेल्यावर आम्हाला बरेच लोक दिसले. आता खरा 'देसी इलाका' सुरु झाला होता. लोक आम्हला पाण्याच्या आणि juice च्या बाटल्या देत होते (वास्तविक आम्ही तीन-चार कि.मी च चाललो असु). माझ्या एका हातात बोर्ड आणि दुसर्या हातात मोडकी छत्री असल्याने कितीही तहान लगली असली तरी पाण्याची बाटली घेणे शक्य नव्हते. काही लोक आम्हाला क़ेळी पण देत होते. ही सगळी तयारी रणरण उन्हात नक्की कामी आली असती. पण पाउस पडला म्हणुन त्याची किंमत कुठेही कमी होत नाही. लोकांचा आणि मुख्यतः आजींचा उत्साह पहुन मग मलाही जोश आला. मागच्या ट्रकवाल्यांसोबत मग मीही 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्' चे नारे द्यायला सुरवात केली. माझ पाहुन आजी ही नार्यांमधे सामील झाल्या आणि हळू हळू आमचा पूर्ण ग्रुप नारे द्यायला लागला. आमचे boards वाचुन आम्हाला समर्थन देण्या करता बरेच लोक टाळ्या वाजवु लागले. काही लोक संस्थेचे cards मागु लागले. आमच्यात इतका उत्साह संचारला की आकाश चांगलेच गळू लागले हे देखील आम्हला कळले नाही.अखेरीस परेड संपली.अचानक माझ्या फोनची मल अठवण झाली. फोनला काहीही झाले नव्हते. मधे फोनचा मला विसर पडला हे फारच बरे झाले. कितीतरी वर्षांनी मी पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला होता. परेड फक्त नट-नट्यांना पहाण्यासाठी नसते हेही लक्षात आले होते.शिवाय माझ्या आसपास लोक किती विविध प्रकारची काम करतात हेही लक्षात आले. तिथे निर्वासीत कश्मिरींचा ग्रुप आला होता, गुजरात आणि बंगलोर मधील स्फोटात मेलेल्या लोकांसाठी प्रार्थना करणारा ग्रुप आला होता, हिंदी भाषेचा प्रचार करणार ग्रुप आला होता. अश्या अनेक धार्मिक आणि सामजिक संस्थांचे प्रतिनिधी तिथे आले होते. या संस्थांना वहुन घेणारे लोक पहिल्यांदाच मला दिसत होते.
माझी पहिली-वहिली परेड अशी अविस्मर्णीय ठरली!
Tuesday, June 17, 2008
सिनेमा आणि माझे (गैर) समज
Tuesday, May 27, 2008
उन्हाळा
अश्या रीतीने उन्हाळ्याची सुट्टी कधी संपायची हे आम्हाला कळतही नसे। आता आजी-आजोबा नाहीत पण त्या आठवणी रसवंतीतील हातमशीनीला लागलेल्या घुंगरांचे आवाज जागे करतात. अजुनही गच्चीवर पाणी टाकतानाचा थंड-गरम अनुभव जसाच्यातसा आठवतो.
Sunday, April 06, 2008
पलिकडचे जग

कुणीतरी खोलीत असावं अशी जाणीव मला सतत होत होती. अचानक डोक्यावरचा ट्युब लाईट अपशकुनी पापणी सारखा फडफडायला लागला. डॉक्टरांची विसीट आत्ताच होउन गेल्याने या अपरात्री bell वाजवुनही कुणी फिरकणार नव्हते. तरी मी हजार वेळेला सांगितले की रात्री दिवे बंदच ठेवा पण ऐकतय कोण! म्हणे hospital ची policy आहे.मरो मेली ती policy. आपल्याला तरी इथे रहायचय किती दिवस. कशाला कटकट करावी.आणि असो मेलं इथे कुणी खोलीत, माझ्याकडे कुथे आहे लुबाडायला खजिना!
पण आता मात्र या लुकलुकणार्या दिव्याचा त्रास होतो आहे. कधी मिट्ट काळोख कधी डोळे दिपवणारा उजेड. अरे का छळताय आजारयाला.बापरे! या लख्ख उजेडानी मी आंधळी झाले की काय? हे काय होतय? अरे कुणी आहे का? मी बोललेलं मलाच ऐकू येत नाहीया. हरे देवा!मी बहीरी झाले की मूकी?आत्ताच डॉक्टर सांगून गेले की आता बरीच सुधारणा आहे आणि आता हे भलतंच काय! माझ्या आयुष्याचा हा शेवट होणार? ते मघाशी जे मला खोलीत कुणीतरी असल्या सारख वाटत होतं तो माझा काळ माझं आयुष्य लुबाडायला आला आहे? आता मला हलकं हलकं वाटतय. कथा-कदंबर्यांमधे वाचलेल्या मरणार्या माणसोबत घडणार्या गोष्टी आता माझ्या सोबत घडताहेत. मी मरणार! संपलं सगळं! आता होइल पाप-पुण्याचा हिशोब त्या चित्रगुप्ता कडे. काय लिहीले आहे प्रारब्धात आता त्या सर्वशक्तिमानालाच ठाऊक.
अगदी कादंबरीत वर्णन केल्या प्रमाणे मला अनिर्बंध वाटतय.पण आजवर मेल्यानंतर पापात्मे अथवा पुण्यातमे दूरुन त्यांच्या आप्तेष्टांकडे पाहतात अश्या कथा माझ्या वाचण्यात आल्या होत्या. आंधळा, मूका आणि बहिरा अश्या दयनीय आत्म्याबद्दल वाचण्यात आले नव्हते. आत्म्यांच्या राज्यात मी नवा record बनवणार असं दिसतंय. चला जिवंतपणी नाही तर मेल्यावरच का होइना काहीतरी वेगळं केलं म्हणायचं! किंवा स्वर्ग/ नरकाकडे जाणारा गुप्त रस्ता कळु नये म्हणुन यमराजानी ही खबरदारी घेतली असावी. काय सांगता, जिथे प्रारब्ध लिहिले अहे तिथे पोहोचल्यावर सगळे इंद्रीय first class काम करायलाही लागतील. तसे झाले तर बरच होइल. Hospital मधे पलंगावर पडुन पडुन अंग दुखायला लगले होते.चला आता पाप पुण्याच्या हिशोबाला तयार होउया. आपलाही नंबर लवकरच लागेल.
अरे! माझा आकार वाढतो आहे की मी अतिसूक्षम झालेय? काळाचे, आकाराचे काही भानच उरले नाही.किती वेळ झाला मला इथे येउन? कोण घेउन आलंय मला? इथली system काय आहे तेच कळत नाही. हे असच चालू राहिलं ना तर मला काही वेळानी मी कोण हेही आठवणार नाही. कोण बरे मी? कुठुन आले? कोण आहे माझ्या मागे रडणारं? काय आहे माझ्यावाचु नडणारं? मला खरंच कही अठवत नाही.सध्या माझ्याजवळ आहे एक विशालतेचा आभास.अनंतातील शाश्वतीची सोबत. मी त्याचा एक भाग आहे. अगदी निर्गुण निराकार. कुणाचेही हाल बघायला मला डोळे नाहीत, कुणाचीही आर्त हाक माझ्या कानावर पडत नाही, कुठेही मी माझा निर्णय बोलत नाही. मला खेचुन आणणारी, मला दिशा देणारी एकच शक्ति आहे. कर्मं!कर्मातच ती ताकद आहे जी मला चांगले-वाईट दोष जोडेल. मला ब्रह्म ठरविण्याची अथवा शिव ठरविण्याची कुवत फक्त कर्मातच आहे. मुळात मी निर्गुण. मी ब्रह्मही, मीच संहारक शिवही आणि मी दोन्ही नाही. मीच रणरणतं वैराण वाळवंट आणि मीच गंगेचं पात्र, मीच एखाद्याचे नशीब आणि मीच एखाद्याचे दुर्भाग्य. अहो वळवाल तशी वळिन मी. पण वाहिन मात्र माझ्या गतीने. समय से पहिले कुछ नही मिलता. पण तुमचे नशीब तुमचे कर्म आहे.
माझ्या कर्माची फळं तर मी कधीच भोगलीत. स्वर्ग - नरक सबकुछ झुठ! तो जो तुमचा आकारा-विकारांचा देश आहे ना, अहो, तेच तर आहे स्वर्ग आणि नरक! हे इंद्रीयांचे चोचले इथे नाही. इथे आहे फक्त माझ्या वाहण्याचा आवाज.माझं वाहणं हेच तेवढं शाश्वत.
काय म्हणता, पुनर्जन्म आहे का? या आंधळेपणाला, मूकपणाला आणि शांततेला घाबरला नाहीत, या सततच्या वाहण्याला कंटाळला नाहीत तर पुनर्जन्म नाही. अन्यथा हे बळ येईतो आहेच पुन्हा तो जन्म.
मी मात्र रमलेय ईथेच. ईथे माझ्याशिवाय कुणीही नाही!